Thursday, August 20, 2009

गणरायाचे आगमन अवघ्या दोन दिवसा वर आले हो ना । तुम्ही सगळे आनंदात नक्की असणार । तुम्हा सगळ्याना आमच्या ब्लॉग तर्फे हार्दिक शुभेच्छा। बर्याच दिवसांची मरगळ झटकून आम्ही तुमच्या सेवेस परतलोय। लोभ असावा। मग काय यंदा चतुर्थी जोरात ना ? मला विचारलेला प्रश्न । " हो कर्ज काढून जोरात " माझे उत्तर । कदाचित तुमचे ही उत्तर हेच असू शकेल । वाढलेल्या महागाही ने भक्त गण काहीसे नाराज़ असतील पण कर्ज मात्र नक्की काढतील । नाही तर घरात बाप्पांचे आगमन थाटात कस होइल । पण बाप्पा तुम्हाला यांच काही पडले आहे का ? आम्ही सगळे भ्ररडले जातोय या महागाही च्या चक्रात । त्यात या स्वाहीन फ्लू ची भर । तुम्ही खरेच आमची उडणारी तारांबळ एन्जॉय करता आहात का ? आम्हाला गरज आहे तुमच्या प्रगट होण्याची । तुम्ही या आणि आम्हाला सोडवा यातून । हीच तुमच्या चरणी प्राथॅना

No comments: